जाणीव
काल मी आणि आई दादरला समर्थ व्यापारी पेठेत गेलो होतो .बसने आम्ही शिवजी मंदिरच्या समोर बस स्टॉपवर उतरलो आणि आम्ही गप्पा मारत रस्ता क्रॉस करत होतो मी आलो पुढे आणि dividerवर उभा राहिलो आणि बघतो तर आई मागेच होती तिने रस्ता क्रॉस केलाच नव्हता . मी त्या divider वर उभा राहून आईकडे बघत होतो आणि मला जाणीव झाली की अरे ती पण माझ्याबरोबर होती तिला घेऊन मला रस्ता क्रॉस करायला हवा होता. आणि त्या 2 मिनीटामध्ये मी भूतकाळात गेलो जेव्हा आई मला शाळेमध्ये घ्यायला यायची तेव्हा रस्ता क्रॉस करताना माझा हात घट्ट पकडायची आणि तिच्यासोबत मला घेऊन रस्ता क्रॉस करायची.आत्ता मी मोठा झालो आणि तिचा हात सोडला आणि म्हणून ती मागे राह्यली आणि मी पुढे निघून गेलो.ही जाणीव फार काही शिकवून जाते माणसाला .आता खरी गरज आहे मी तिचा हात पकडण्याची ..आणि काल नवरात्रीचा पहिला दिवस. ह्याच दिवशी आपण सर्व मोठ्या आईची स्थापना करतो .त्या आईने आपला हात घट्ट पकडला आहेच पण आपण तो सोडून ह्या मोहमायेच्या जत्रेत भटकत असतो.म्हणून आपण तिचा हात घट्ट पकडला पाहिजे तरच आपण ह्या विश्वातील कोणताही रस्ता आरामात क्रॉस करू शकतो तिच्यासोबत.
108% ती आपल्या सोबत असतेच.
No comments:
Post a Comment