गर्द सभोवती....
गर्द सभोवती....हे लोटस पब्लिकेशन प्रा.लि. आणि आशालता वाबगावकर लिखित पुस्तक वाचले. त्यातील अनेक लेख मी आधी दैनिक प्रत्यक्ष ह्या वृत्तपत्रांमध्ये त्या लिहीत होत्या त्यावेळी वाचले होते.त्यांचा प्रत्येक लेख वाचताना नेहमी कौतुक वाटायचे की ह्या इतक्या सुंदर आणि हृदयस्पर्शी कसे लिहितात.त्यांच्या प्रत्येक कथा मनाच्या ठाव घेणाऱ्या असतात.ह्या पुस्तकामध्ये एकूण ६७ कथा आहेत.सर्वच कथा खूप छान आहेत पण मला अवडलेल्यापैकी हो वाट पाहतोय,काचेच्या बांगड्या,तुम्ही मले नेणार नाय?,वेदना,अवलिया,येई हो विठ्ठले ह्या जास्त भावल्या.
आजपर्यंत आपल्याला आशालता वाबगावकर ह्यांची फक्त एक अभिनेत्री आणि गायिका एवढीच ओळख होती.पण त्यांच्यामध्ये एक संवेदनशील मनाची लेखिकासुद्धा दडलेली आहे हे अनिरुद्ध बापूंनी म्हणजेच आमच्या सद्गुरूंनी जाणले.आणि त्यांच्या हाती लेखणी धरण्याची ताकद व त्या लिहू शकतात ह्या विश्वास त्यांनी दिला.गर्द सभोवती रानसाजणी तू तर चाफेकळी बालकवींनी लिहिलेले आणि पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यानी स्वरबद्ध केलेले गीत आशालता वाबगावकर ह्या गायिका-अभिनेत्रीने अजरामर केले.ह्या कथेतील पात्र काही निसर्गाने दिली तर काही त्यांच्या सभोवती सापडली आणि म्हणूनच त्यांनी आपल्या पुस्तकाला गर्द सभोवती हे नाव दिले असावे असे मला वाटते.
आशालता ताईंच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे साधे,सोपे विषय आणि ओघवती लेखनशैली. आजवरच्या कथेतील बरीच माणसे त्यांच्या आयुष्यात येऊन गेली काही,कुठेना कुठेतरी भेटली गेली.त्यांच्या व्यवसायानिमित्त त्या सतत बाहेर असत तिथे काही दिसले की त्या आपल्या डायरीमध्ये नोंद करून ठेवीत.काही किस्से येता जाता घडत तेही टिपून ठेवीत.निसर्गाची ओढ असणाऱ्या आणि समुद्राची विशेष आवड असणाऱ्या आशालता ताईंनी लिहिल्याला ह्या कथा आपल्याला खूप काही शिकवून जातात.जसे की नात्यांची किंमत,जगण्याची उमेद,खचून न जाता परिस्थितीशी मुकाबला करणे,आपल्याला लाभलेले निसर्गाचे वरदान आणि बरच काही...
आशालता ताईंनी ज्याप्रमाणे ह्या कथा लिहिल्या तेव्हाचा तो त्यांचा नजरिया आपल्याला जगण्याकडे वेगळया पद्धतीने बघायला शिकवतो.त्यांच्या लिखाणात संवेदनशील मनाच्या व्यक्तीचे प्रतिबिंब जाणवते.त्यानी रोजच्या जगण्यातील कितीतरी संदर्भ इतक्या हळुवारपणे या कथामध्ये मांडले आहेत की ते वाचून थक्क वाहायला होते.
ह्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला मला उपस्थित राहण्याचा योग आला.आयुष्यात पहिल्यांदा कोणत्यातरी पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मला उपस्थित राहता आले.आणि ते केवळ शक्य झाले लोटस पब्लिकेशन प्रा.लि. ह्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा खूपच दिमाखदार झाला.
आशालता ताईंनी उत्तरोत्तर असे अनेक लेख आणि पुस्तकं लिहीत राहवी ही सदगुरुचरणी प्रार्थना!आणि त्यांना अनेक शुभेच्छा!
- सुयश गावड
,
No comments:
Post a Comment